येथील आंतरभारती शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या आंतरभारती माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रा डॉ अशोक सिद्धेवाड यांनी मनोगत व्यक्त करताना अण्णाभाऊ साठे हे कलावादी साहित्यिक नसून जीवनवादी साहित्यिक होते असे प्रतिपादन केले आहे….
बिलोली येथील आंतरभारती शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या आंतरभारती माध्यमिक विद्यालय, पूज्य साने गुरुजी प्रथामिक विद्यालय,विजय पटने मेमोरियल स्कूल बिलोली या शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पीपल्स कॉलेज नांदेड येथील प्रा डॉ अशोक सिद्धेवाड हे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे प्रतिपादन केले की,अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आहे समाजाचा आरसा आहे, जे समाजामध्ये घडले तेथे साहित्यात आले पाहिजे, साहित्य हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही साहित्य कलावादी तर काही साहित्य जीवनवादी असतात त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे कलावादी स्वरूपाचे नसून जीवनवादी साहित्य होते. ते दीड दिवस शाळेत जाऊ जवळपास 50 च्या आसपास कथा, कादंबरी, नाटक, लोककथा असे साहित्य निर्माण केले आहे. ते एक जागतिक दर्जाचे किर्तीमान साहित्यिक म्हणून नावारूपाला आले आहेत, त्यांनी आपल्या साहित्यातून कामगारांच्या उत्थानासाठी विचार मांडले,त्यांच्या विचारातून स्वाभिमान जागृत होतो, त्यांनी साहित्यातून जगण्यासाठी मरणाऱ्या लोकांचे साहित्य लिहिलेले दिसून येते त्यांच्या साहित्याचे चिंतन व अभ्यास प्रत्येक व्यक्तीने करावा असे प्रतिपादन केले आहे.
यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष गंगाधररावजी पटणे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ अशोक सिद्धेवाड, रावसाहेब मोरे, मुख्याध्यापिका जयमाला पटणे, देगलूरकर सर,विठ्ठल चंदनकर,दिगंबर गंगूलवार, आदीसह सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते……
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy