येथील आंतर भारती शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या आंतर भारती माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभचा कार्यक्रम घेऊन त्यांना निरोप देण्यात आला आहे.
या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात बिलोलीचे पोलीस निरीक्षण शिवाजीराव डोईफोडे यांनी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून विध्यार्थ्यांना प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले तर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे निराकरण करण्यात आले. तसेच दुसऱ्या सत्रात दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांसह संस्थेचे अध्यक्ष गंगाधरराव पटणे यांनी मनोगत व्यक्त केले आहे.
यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष गंगाधरराव पटणे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सहसचिव तथा मुख्याध्यापिका जयमाला पटणे, मुख्याध्यापक विठ्ठल चंदनकर आदीसह सहशिक्षक विनायक इंगळे, शैलजा देशपांडे, लालू परसुरे, माधव मोरे, बालाजी पोरडवार, पद्मावती शिळेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय यमेकर यांनी केले तर आभार अमरनाथ कांबळे यांनी मानले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy