नाफेड मार्फत आठ राज्यस्तरीय संस्थांमार्फत हरभरा खरेदी होणार असल्याचे शासनाने सांगितले व तशा पद्धतीची नोंदणी शेतकऱ्यांनी करावी असे आवाहनही करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात चार संस्थांमार्फत जवळपास 60 प्रस्ताव नाफेड मार्फत खरेदी करण्याचे प्रस्ताव गेलेले आहेत परंतु अद्याप पर्यंत जवळपास 60 प्रस्तावा पैकी एकही खरेदी केंद्र सुरू करण्यास नाफेड ने मान्यता दिलेली नाही त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक होत आहे.
शासनाचा हरभऱ्याचा हमीभाव 5335 रुपये आहे. तर बाजारामध्ये हाच चना 4500 रुपये भवाने व दोन ते तीन किलो कट्टी अशा पद्धतीने घेतल्या जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या संदर्भात जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यामार्फतही संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेऊन तात्काळ खरेदी केंद्र सुरू करावी अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
नाफेड चे ब्रँच मॅनेजर मुंबई यांनाही नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व प्रस्तावांना तात्काळ मान्यता देऊन नाफेडमार्फत खरेदी केंद्रे सुरू करावी अशा पद्धतीचे निर्देश खासदार चिखलीकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत नाफेड ने तात्काळ हरभऱ्याची हमीभावाने खरेदी सुरू करून शेतकऱ्यांची लूट थांबवावी शेतकऱ्यांनी गडबड न करता नाफेड मार्फत हरभरा खरेदी होणार असल्यामुळे हमीदरानुसारच आपला हरभरा विकावा असे आव्हान महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy