नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी लोक उपयोगी कामे करावीत – बालाजी बच्चेवार

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आलेल्या सरपंच सदस्याने लोक उपयोगी कार्य करावीत असे प्रतिपादन भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केल आहे.
नव्याने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न झालेलया आहेत. विविध गटाचे व पक्षाची लोक सरपंच सदस्य म्हणून निवडून आले आहेत. आता निवडणुका पार पडल्या आहेत. निवडणूक झाल्यानंतर सरपंच व सदस्य हा संपूर्ण गावचा असतो. याची जाणीव निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी ठेवणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू लोकांची प्राधान्याने सेवा करण्याची जबाबदारी नवनियुक्त सरपंचाची आहे. ग्रामपंचायत च्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची जबाबदारी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे आहे. गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्याची व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता या गोष्टीकडे प्राधान्य दिल पाहिजे.
नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन गावचा विकास करून घेणे अपेक्षित आहे. येणाऱ्या काळात आपणच आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करणार आहात. याची जाणीव ठेवून काम करावे असेही पुढे बोलताना भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना संदेश दिला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या