नायगांव तालुक्यातील बरबडा वाडी या गांवच्या स्त्याची तात्काळ दुरुस्ती करा – सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांची मागणी !
![](https://massmaharashtra.com/wp-content/uploads/2021/06/IMG-20210609-WA0008-1024x795.jpg)
नायगांव नायब तहसिलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाव्दारे केली मागणी !
( नायगांव / प्रतिनिधी ९ जुन )
नायगांव तालुक्यातील बरबडा वाडी जाणाऱ्या रस्त्याची कित्येक दिवसापासून दैनीय अवस्था झाली असून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बरबडा वाडी येथील नागरिकांना मरण यातना सोसण्याची वेळ आली आहे, बरबडा वाडी येथील एखादा नागरीक / पेशेंट आजारी असेल तर त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बरबडा येथील गावकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे अशी वस्तुस्थिती बरबडा वाडी पुनर्वसित गांवात असून येथे पर्यायी मार्ग दुसरा उपलब्ध नसल्यामुळे बरबडा वाडी येथील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व गावकऱ्यांच्या दयनीय अवस्थेची दखल घेऊन रस्त्याची तात्काळ सुधारणा करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते – शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी लेखी निवेदनाद्वारे नायगांव नायब तहसिलदार डि.डि.लोंढे यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, दिलेल्या निवेदनावर ( डेबुजी फोर्स ) चे नांदेड जिल्हाध्यक्ष मारोती ईकळीकर यांची स्वाक्षरी आहे.
www.massmaharashtra.com