भारत जोडो यात्रेनिमित्त तालुक्यात प्रत्येक गावात जन जागरण बैठका चालू.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
राष्ट्रीय युवा नेते भावी पंतप्रधान आदरणीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते कश्मिर पर्यंत ऐतिहासिक “भारत जोडो” यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठका चालू.

तालुक्यातील प्रत्येक गावात बैठका घेवून या ऐतिहासिक पदयात्रेत बहुसंख्येने सहभागी होण्यासाठी आज मौजे होटाळा, खंडगाव, मुगाव, धानोराा, कांडाळा, मरवाळी (तांडा), खैरगाव या गावात गावक-यांसी अवाहन करण्यात आले.

या प्रसंगी नायगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण, नेतृत्वाखाली नायगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, मा.उपसभापती संजय पाटील शेळगावकर, प्रल्हाद पाटील पवार, बापुराव पा.पवार, अविनाश कदम, पांडुरंग पाटील, भगवान पाटील कदम, दिगंबरराव पाटील कदम, गोविंदराव जोनकले, नारायण पाटील गाडले, दिगंबरराव पाटील मुगावकर, रावसाहेब ताटे, गणेश गाडले, माधवराव डोनगावे, बालाजी पाटील ताटे, बालाजी पाटील श्रीरामे, किशन पाटील ताटे, सुधारक संत्रे, के.आर.राठोड, श्रीनिवास जाधव, शंकर पाटील धानोरकर, शिवाजी पाटील कु-हाडे, वाघजी वाघमारे, वसंतराव जाधव, माधवराव शिंपाळे, मेहताब साब यांच्यासह बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या