नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे कश्मीर ते कन्याकुमारी भारत जोडो यात्रा निघालेल्या काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष युवा नेते खा राहुल गांधी नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ येथून निघालेल्या नरसी सह नायगाव शहरात हजारोंच्या संख्येने भव्य दिव्य भारत जोडो यात्रा रॅली निघाली.
या रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण, आमदार अमरभाऊ राजुरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांच्या सह आंध्रा महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू येथील प्रमुख मंडळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार वसंतरावजी चव्हाण यांच्या यांच्यावतीने राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले.
राहुल गांधी यांच्या सोबत पदयात्रेमध्ये माजी आमदार यांचे सुपुत्र युवा नेते प्राचार्य रवींद्र पाटील चव्हाण, अध्यक्ष विजय पाटील चव्हाण, नगरसेवक पंकज पाटील चव्हाण, सदस्य संजय बेळगे सहभागी होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy