बिलोलीत पुलवामा येथे शहिद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली !

[ बिलोली प्रतिनिधी – सुनिल जेठे ]
शहरातील गांधी चौक येथे दि.१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे शहिद झालेल्या शहिदांना बिलोली शहराच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

पुलवामा येथे ४० शहिद झालेल्या भारतीय जवानांना श्रध्दांजली देण्यासाठी उपस्थित झालेले सेवानिवृत्त भारतीय सिमा दलाचे जवान संतोष उत्तरवाड यांनी देशासाठी सेवा केलेल्या कामाचे अनुभव व्यक्त करुन कँडल प्रज्वलीत कतर श्रद्धांजली दिले. श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन इंद्रजीत तुडमे, राजकुमार गादगे, सय्यद रियाज यांनी केला होता.

या श्रद्धांजंलीच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर नागरीकांनी शहिद जवाना बद्दल असलेले प्रेम त्यांच्या सेवा कार्याची माहिती सागून श्रध्दांजली वाहून शहिद जवान अमर रहे असे नारे देण्यात आले. या वेळी माजी न.प.अध्यक्ष विजय कुंचनवार, इंद्रजीत तुडमे, शंकर मावले, साईनाथ आरगुलवार, माधव निवघे, कुलदिप ईनामदार, प्रकाश कंधारे, संतोष उत्तरवाड, साजिद कुरेशी, सय्यद रियाज, राजुकुमार गादगे, रमेश पवनकर, शिवकांत महिलारे, आनंद चंचलवाड, सुरेश मुकडे, सुनिल जेठे,यादव लोकडे, संघपाल गवळे, पवन गादगे, विश्वजित तुडमे, अनिकेत गादगे, रोषन तुडमे, साईनाथ नरवाडे, भिम देवकरे, नागनाथ संगमवार, रवी कल्याणकर, ब्रहम्माकुमारी शिवप्रिया बहेनजी, सारिका बहेनजी, यशोदा बहेनजी, गणेश महेत्रे, नरेश तोटलवाड, प्रकाश कासलोड, गोविंद मीरदोडे, मोहन मेडेकर, ओम आदमनकर, विजयसिंह चव्हाण, संगम हरने, संभाजी हरणे, एकनाथ शिरगीरे, साईनाथ शिरोळे, नागनाथ संगेवार व आदि नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या