चरी गावात शेतामधे विज पडुन एका साठवलेल्या भाताच्या मलनिवर विजेमुळे आग लागली

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]

दिनांक 17/11/2021 वार बुधवार रोजी आचानक पडलेल्या पावसामुले शेतकरी संकटात. अलिबाग तालुक्यातील चरी या गावामधे काल पडलेल्या पावसामुळे एका शेतामधे विज पडुन एका साठवलेल्या भाताच्या मलनिवर विजेमुळे आग लागली.

त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास अचानक पडलेल्या पावसामुळे जळून खाक झाला. लवकरात लवकर जळालेल्या भाताचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा. तसेच अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे अलिबाग मधल्या काही शेतकऱ्यांच्या शेतातल्या भाताला कोम आलेत त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
www.massmaharashtra.com

युट्युब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी फोटोवर क्लिक करा.

ताज्या बातम्या