बिलोली शहरातील आंबेडकर नगर येथे शौर्य दिन साजरा करण्यात आला. आंबेडकर नगर येथे सकाळी १०:३० वाजता ज्ञान अलंकार बौद्ध विहारात त्रिशरण पंचशील घेण्यात आले. त्यानंतर भीमा कोरेगाव येथील शूरवीरांना मानवंदना देण्यात येवुन भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त या विहारात सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली असुन २६७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परिक्षामधे सहभाग नोंदवला. लगेच बक्षीस वितरण सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त होणार असल्याचे संयोजकाकडुण कळविण्यात आले.
या कार्यक्रमास बहुसंख्य बौद्ध उपासक उपासिका यांची खुपच गर्दी दिसुन आली. तर नवीन बस स्टॅन्ड बिलोली येथील आंबेडकर पुतळ्याजवळ शूरवीरांना मानवंदना देण्यात आली त्यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, एल एम जाधव सर, बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष वारघडे सर, जयंती मंडळाचे सल्लागार मुन्ना पोवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी आपले भाषणे केले. गिरी प्रतीक्षा प्रीती गायकवाड शितल सोनकांबळे यांनी आपलं मनोगत मांडले. ठिकाणी सूत्रसंचालन पत्रकार धम्मपाल जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन जयंती मंडळाचे उपाध्यक्ष अमोल जाधव यांनी केले. या कार्यक्रमास बहुसंख्य बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy