ऑल इंडिया पॅंथर संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांचा ईव्हीएम विरोध तसेच दलितांवरील अत्याचाराच्या विरोधात राज्यभर दोरा सुरू आहे याच दौऱ्या दरम्यान ऑल इंडिया पॅंथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार हे लोहा तालुक्यात आले असताना लोहा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.याच पत्रकार परिषदेमध्ये विविध विषयांवर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,की देश हा अराजकतेचा दिशेने जात असून ईव्हीएम मुळेच लोकशाहीची हत्या होत आहे.
देशभरात दलितांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असून दलित अत्याचार ही राष्ट्रीय आपत्तीच आहे देशामध्ये मुस्लिम दलित द्वेष पसरवून हुकूमशाही हिटलरशाही चा उदय होत असून देशाच्या अधोगतीला सुरुवात होत आहे.
ऑल इंडिया पॅंथर संघटना ईव्हीएम च्या विरोधात ,खासगीकरणातून आरक्षण मिळवणे, रमाई घरकुल योजनेसाठी ग्रामीण भागात पाच लक्ष व शहरी भागासाठी सात लक्ष रुपये मिळावेत, तसेच सांस्कृतिक दहशतवाद व त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढा देणार आहोत असे ते म्हणाले पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, सर्वच पुरोगामी नेते दलित ओबीसींच्या प्रश्नावर ब्र शब्दही काढत नाहीत त्यामुळे आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये चाचपणी करून उमेदवार उभे करणार आहोत.
पत्रकार परिषदेसाठी ऑल इंडिया पॅंथर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष विनोद भोळे, जिल्हाध्यक्ष विनोद फुगारे, युवा जिल्हाध्यक्ष सुरेश सावते, तालुकाध्यक्ष प्रदीप वाघमारे, तालुका उपाध्यक्ष मनोज गवारे, पत्रकार परिषदेचे आयोजन तथा लोहा शहर अध्यक्ष आकाश धुतमल यांच्यासह पत्रकार व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy