काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रा दरम्यान रास्त भाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ एडके यांच्यासह तालुकाध्यक्ष संतोष पाटील बामणे यांनी राशन दुकानदारांना येणाऱ्या अडीअडचणी व शासनाची भूमिका या बाबत राहुल गांधी यांच्या सोबत मनसोक्त चर्चा करून कांही प्रश्न शासन दरबारी मांडण्याची विनंती एका निवेदनाद्वारे केली असून याच वेळी खा.राहुल गांधी यांचा संघटनेच्या वतीने सत्कारही केला आहे.
केलेली मागणी व गर्दीतील राहुल गांधी यांनी दिलेला प्रतिसाद यामुळे राशन दुकानदारात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.
यावेळी प्रामुख्याने सादिकभाई मरखेलकर, जमिल नांदेडकर, गोविंद पाटील खतगावकर, प्रदुम विठ्ठलराव जाधव, नाईक मिनकीकर, हानमंत कामन्ना पाटील,राहुल गोणेकर, शुभम मंगनाळे, भास्कर तरटे, बालाजी नाईक, मन्मथ बामणे यांच्यासह तालुक्यातील राशन दुकानदार उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy