कंधार तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी मुळे हतबल झाले आहेत. त्यातच शासना कडुन आर्थिक अनुदान हि अत्यंत तुटपुंज्या स्वरुपात देण्यात आले. विमा कंपनीने तर विमा मंजुर करुन विमा परतावा करताना शेतकर्यांची एक प्रकारची चेष्टाच केली आहे. हे सर्व शेतकरी बांधव सहन करत असताना मधेच सक्तीने विज बिल वसुली व वीज कलेक्शन तोडणे चालु केल्यामुळे शेतकरी पुर्णतः हतबल झाले आहेत.
शासन एका हाताने तटपूंजी मदत देते व दुसर्या हाताने दाम दुप्पट वीजबील शेतकरी बांधवांकडुन काढुन घेते. अशा शासकीय धोरणामुळे शेतकर्यांसमोर आत्महत्ये शिवाय पर्याय उरलेला नाही. असे मत मास महाराष्ट्र न्युज शी बोलताना वंचित बहुजन आघाडी कंधार तालुका अध्यक्ष संतोष पाटील गवारे यांनी व्यक्त केले आहे.
सक्तीची वीजबिल वसुली व शेतकऱ्यांची वीज तोडणी त्वरीत थांबवावे असा ईशारा दिला आहे. सक्तीची वसुली न थाबवल्यास पुढील काळात शेतकर्यांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघांडी रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही.
सक्तीची वसुली करणार्या व विज कलेक्शन कट करनार्या अधिकार्यांना उत्तर देण्यात येईल. यात कायदा व सुव्ययवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे कंधार तालुकाध्यक्ष संतोष पाटील गवारे यांनी दिला आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy