हर घर तिरंगा मोहीमेत नागरीकांनी सक्रीय सहभाग घ्यावा – नगराध्यक्षा गीता जाधव !

[ नायगांव तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 देशाला स्वातंत्र्य मिळून 75 पूर्ण होत असल्यामूळे नायगांव नगरपंचायतीकडून वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत त्यामुळे नायगांव शहरातील माजी आमदार वसंतराव चव्हाण मित्रमंडळ नायगाव व नगर पंचायत नायगांव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने हर घर तिरंगा कार्यक्रम स्वयंस्फूर्तीने राबवण्याचे निश्चीत केले आहे.
तेव्हा नागरीकांनी येत्या 13 ऑगष्ट ते 15 ऑगष्ट या कालावधीत प्रत्येकाने हा उपक्रम राबवावा असे आव्हाण नायंगाव नगरपंचायत अध्यक्षा गीता नारायण जाधव, उपाध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर नागरीकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघाण्यात तसेच स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात या साठी हर घर तिरंगा मोहीम राबवण्याचे शासनाने 62 वीचे आहे.
या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतीहासाचे आपण अभिमान पूर्वक स्मरण करण्यासाठी शासनाने येता 13 ऑगष्ट ते 15 ऑगष्ट या तीन दिवसाच्या कालावधीत प्रत्येक नागरीकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज लाऊन हर घर तिरंगा ही मोहीम अधिक व्यापक करावी असे आव्हान नायगांव शहरातील नायगाव नगर पंचायतीचे नगराध्यक्षा गीता नारायण जाधव उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांनी केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या