अपहरण करून तरुणाचा खून ; बिलोली तालुक्यातील सुलतानपूर येथील घटना !

( कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे )
            येथून 5 किमी अंतरावर असलेल्या बाभळी बंधारा येथील गोदावरी नदी पात्रात सुलतानपूर येथील अशोक जोगे वय 22 वर्ष या युवकाचा पाण्यात टाकून खून केल्याची घटना दिनांक 23 रोजी उघडकीस आल्यानंतर सदरील घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
              कुंडलवाडी पासून 3 किमी अंतरावर असलेल्या मौजे सुलतानपूर येथील अशोक जोगे वय 22 वर्ष हा तरुण दिनांक 20 मे पासून बेपत्ता होता त्याचा मृतदेह शेळगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रात दिनांक 23 रोजी आढळून आल्यावर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून घटनास्थळाचा पंचनामा करून चौकशीचे चक्र फिरवले.
            सदरील घटना हि मागील भाडण्याच्या कारणावरून जिवे मारण्याच्या उद्देशाने सदरील तरुणाचे अपहरण करून शेळगाव थडी शिवारा जवळील गोदावरी नदीच्या पाण्यात टाकून खून केल्याची फिर्याद जमुना सैदन्ना जोगे वय 45 रा सुलतानपूर ता बिलोली यांनी दिली होती, त्यांच्या या फिर्यादी वरून आरोपी शिवाजी कांबळे,पिंटू कांबळे,वैजनाथ पाटील कुकनोर,सिद्धार्थ लाखे,गंगाधर पोकर्णिकर, सर्व राहणार सुलतानपूर यांच्या विरुद्ध गुरन 58/ 24 कलम 302,364,201,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून सदरील चार आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी दिपक मस्के हे करीत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या