कुंटूर कृषि संजिवनी मोहिम संपन्न !

दुबारा पेरणीची पाहणी देगलूर उप विभागीय अधिकारी सोनटक्के साहेब यांनी केली
( विशेष प्रतिनिधी – बालाजी हनमंते कुंटुरकर )
नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथे कृषि संजिवंनी मोहिम दि २९ जुन मंगळवार रोजी संपन्न झाली.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत राबवण्यात येत असलेल्या कृषी संजीवनी मोहीम 21 जून ते 1 जुलै अंतर्गत मोहिम मध्ये कुंटूर येथे शेतकरी शेती तंत्रज्ञान शिबिर संपन्न झाले.
सदर शेती तंत्रज्ञान शिबीर मध्ये मा उप विभागीय कृषी अधिकारी सोनटक्के साहेब मा बि एस शिगारे तालुका कृषी अधिकारी नायगाव व कृषी सहाय्यक रामदास भुताळे व इरफान शेख यांनी BBF पेरणी पद्धत, रुंद सरी वरंबा पद्धत, पट्टा पेर पद्धत, बियाणे बीज प्रक्रिया, आरोग्य पत्रिका नुसार खताची मात्रा, पिकावरील रोग व किड व्यवस्थापन, MREGS फळबाग लागवड योजना, एक गाव एक वाण लागवड पद्धत,मा सोनटक्के, उप विभागीय शोतामधे जाऊन दुबार पेरणीचे कशामुळे करावी लागेली का करावी लागली अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

सदर शेती तंत्रज्ञान शिबिरात गावातील सरपंच प्रतिनिधी मा मारोतराव कदम ,उपसरपंच शिवाजी पा.होळकर ग्रामपंचायत सदस्य,दत्तू नालिकंटे व पत्रकार बालाजी हनमंते, शंकर पाटील आडकीने, दिगंबर झुंबडे, व या परीसरातील अनेक शेतकरी माधव पा आडकीने, रघुनाथ संगेवार. दत्ता जाधव, मोहनराव आडकीने, लक्ष्मण दता शिंगणे, बालाजी माधव आडकिने, गणपत मंनुरे, विलास माधवराव धामनगावे जयराज माधवराव टेबरे, मारोती दत्ता कदम, शंकर संगे, कोडीब कदम,, विठ्ठल रिटेवाड मौका खाजा मीया, श्यामसुंदर मामीडवार गणेश अप्पा संभाय्या आप्पा,मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या