येथील शहर व परिसरात गेल्या चार दिवसापासून चक्रीवादळासह जोरदार पाऊस पडत आहे. दिनांक 30 रोजी दुपारी जोरदार पावसासह चक्रीवादळ सुटल्यामुळे डॉ आंबेडकर नगर येथील दोन सिमेंटचे विद्युत पोल व अनेक झाडे तुटल्यामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
कुंडलवाडी शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसापासून जोरदार पावसासह वादळवारा, गारपीट होत आहे. या पावसात अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून गेल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.
दिनांक 30 रोजी शहर व परिसरात दुपारी 2 वाजताच्या दरम्यान जोरदार गारा पावसासह चक्रीवादळ सुटल्यामुळे शहर व परिसरातील अनेक झाडे, विद्युत पोल तुटून पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. खंडित झालेला विद्युत पुरवठा रात्री उशिरा सुरू होईल अशी श्यक्यता आहे.या जोरदार पावसामुळे शहरातील नाल्यांना नदीचे स्वरूप आल्याचे पहावयास मिळाले त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे .
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy