मानव हित लोकशाही पक्षाची बैठक संपन्न !

( उमरी वार्ताहार )

लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे त्यांच्या माध्यमातून मातंग समाजाला फार मोठी नवसंजिवनी मिळाली, त्यासाठी सर्व नांदेड जिल्ह्या मधील मानवहित लोकशाही पक्षाची बैठकीचि सुरुवात डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पूजन करून सुरुवात केली.या बैठकीत कोअर कमिटी अध्यक्ष अड .टी.एन. कांबळे साहेब मार्गदर्शनात बैठकीचा मुख्य उद्देश गाव तिथे शाखा ,गावा -गावातील घरा -घरातील मानवहित पक्षा च नाव पोहोचाव ,पक्ष बळकट करणे हाच माझा बैठकीची मुख्य उद्देश आहे ,आणि गाव तिथे शाखा झालीच पाहिजे असा उपक्रम राबण्याचा सल्ला कार्यकर्त्यांनां दिला.या दरम्यान नांदेड जिल्ह्यातील नवीन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली ,नांदेड जिल्ह्यातील पदाधिकारी जिल्हाध्यक्ष मालोजी वाघमारे, मा. व्यंकटराव सोनटक्के, (महाराष्ट्र प्रचारक)मा. बाळासाहेब खानजोडे ( महाराष्ट्र सचिव),मा.के.वाय.कांबळे (जिल्हा अध्यक्ष दक्षिण), व तसेच मा. प्राध्यापक पी एन धसाडे सर (जिल्हा प्रवक्ता ) यांच्या मार्गदर्शनाखालील मा, किशन इंगळे पळसगावकर (जिल्हा उपाध्यक्ष),मा . सुमन ताई वाघमारे जिल्हाध्यक्ष नांदेड,मा, संजय सूर्यवंशी (उमरी तालुका अध्यक्ष),मा, गजानन गायकवाड मुखेड (अध्यक्ष,)मा.किशोर कवडीकर (युवा अध्यक्ष उमरी,) साईनाथ गायकवाड (सचिव )मा, बाबू रोडेकर (युवा उपाध्यक्ष),मा, वाघमारे (ऑटो युनियन अध्यक्ष उमरी),मा, सूर्यवंशी हुंडेकर (कामगार आघाडी अध्यक्ष,)मा, विठ्ठल रोडेकर, मानवहित लोकशाही पक्षाचे कार्यकर्त्यांना लवकरच गाव त्या ठिकाणी शाखा स्थापना करा असे आव्हान करण्यात आले त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष शिवाजी म्हात्रे यांनी केले आभार प्रदर्शन दत्ता काळे यांनी केले

ताज्या बातम्या