मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नायगाव शहरामध्ये मोठ्या उत्साहात सोहळा साजरा !

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त नायगाव शहरांमध्ये स्वातंत्र्य वीर कर्मयोगी संन्याशी स्वामी रामानंद तीर्थ चौक येथे नाम फलकाला पुष्पहार अर्पण करून, सर्व वीरांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठलराव पाटील शिंदे तर प्रमुख पाहुणे कदम सर सुजलेगावकर होते. प्रमुख उपस्थिती भाऊराव पाटील चव्हाण यांच्या उपस्थितीत तर नायगाव विधानसभा मतदारसंघाचे उगवते नेतृत्व गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
तसेच या म्हणी प्रमाणे
*”या मातीच्या पुण्याईचा*
*टिळा कपाळी लावू …”*
*”जोवर वाहे गोदामाई*
*तोवर गाणे गाऊ …”*
निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी झालेल्या रणसंग्रामातील धगधगत्या आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या असंख्य ज्ञात, अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या ज्वाज्वल्य स्मृतीस विनम्र अभिवादन केले गेले.
या कार्यक्रमास उपस्थित गजानन पा.तमलुरे (शिवसेना शहर प्रमुख), चंद्रकांत चौधरी, मारुती कतुरवार, दिलीप परतवाड, दिगंबर खांडरे, संजय पप्पू सुर्यवंशी, बालाजी अलगुलवार भास्कर परतवाड, परमेश्वर सुकने, श्रीनिवास चव्हाण असंख्य बांधवच्या उपस्थिता सह मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी अभिवादन करत एकमेकास मनपुर्वक शुभेच्छा दिल्या.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या