शेतीचे पंचनामे करताना विमा प्रतिनिधींसोबत कृषी अधिकारी उपस्थित नसल्यास पंचनामे करू देऊ नये. – आ.राजेश पवार

[ नांदेड- दि.२०|०९|२०२१ ]

आपल्या मतदार संघातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई साठी सुरू असलेल्या विमा कंपनीच्या पंचनाम्या दरम्यान, कृषी अधिकारी ही उपस्थित असावेत असे निवेदन नायगांव विधानसभा मतदार संघातील आमदार राजेश पवार यांनी मा.जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
तरी अजूनही बऱ्याच ठिकाणी कृषी अधिकारी उपस्थित नसून विमा कंपनीचे प्रतिनिधी एकट्यानेच पंचनामे करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
हा प्रकार कोणत्याही शेतकऱ्यास आढळून आल्यास त्वरित आपल्याशी, मा.जिल्हाधिकाऱ्यांशी किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधावा अस आवाहन आमदार राजेश पवार यांनी शेतकरी बांधवाना केलं.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या