मा आ वसंतराव चव्हाण यांनी आपल्या दमदार नेतृत्वाने अनेक नगरसेवक यांना नगराध्यक्षपदावर बसविले त्या पदाचे मानकरी ठरविले आणि नगराध्यक्ष झालेले नगरसेवकही त्यांच्या शब्दाला जागले, हाच मोठेपणा नायगाव नगरीतील ग्रामस्थांना दिसून येत आहे.
[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
मा.आमदार वसंतरावजी पाटील चव्हाण साहेबांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे माजी नगराध्यक्ष मीनाताई सुरेश पाटील कल्याण यांनी नगरपंचायतच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्या अनुषंगाने आज सौ. अर्चनाताई संजय पाटील चव्हाण यांचा काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला.
यावेळी श्रीनिवास पाटील चव्हाण,विजय पाटील चव्हाण (उपनगराध्यक्ष न.प.नायगाव) युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण, सय्यद रहीम शेठ (माजी सभापती) सुधाकर पाटील शिंदे, नारायण पाटील जाधव, पंकज पाटील चव्हाण, विजय भालेराव,पंढरी भालेराव, रवींद्र भालेराव, शरद भालेराव,पांडू पाटील चव्हाण, गजानन पाटील कल्याण, दयानंद भालेराव, दिलीप पाटील पांढरे,माणिक पाटील चव्हाण, बंटी पाटील शिंदे, शकील भाई हाजी साहब, गंगाधर मद्देवाड, हनुमंत बोईनवाड, विठ्ठल आप्पा बेळगे, अजिंक्य कल्याण, विश्वनाथ पाटील तमलूरे, सुरज शिंदे, साहेबराव शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy