भोकर – दिवशी बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीस फाशी द्या – प्रजासेना

जोपर्यंत अशा नराधमास तात्काळ फासावर लटकवले जात नाही तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत. यासाठी नवीन दिशा कायद्याची कडक अंमलबजावणी करावी असे मत आजाद समाज पार्टीत नुकतेच प्रवेश केलेले व प्रजासेना संघटना प्रमूख  अरूणकुमार सुर्यवंशी यांनी व्यक्त केल आहे.

(नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी)

दि. २२ जानेवारी २०२१..

भोकर/दिवशी येथे चिमुकल्या मुलीवर झालेल्या बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीस दिशा कायद्यांतर्गत फाशीची तात्काळ शिक्षा द्यावी.  अशी मागणी प्रजासेना संघटना धर्माबाद च्या वतीने करण्यात आली आहे.

माननीय धर्माबाद तहसीलदार कार्यालयातून जिल्हाधिकारी नांदेड यांना हे पत्र पाठवण्यात आलं आहे.

या पत्राची प्रत मा.प्रधानमंत्री, मा.केंद्रीय गृहमंत्री,मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र उद्धव ठाकरे,मा.गृहमंत्री महाराष्ट्र, राहुल प्रधान-प्रदेशाध्यक्ष आजाद समाज पार्टी, महाराष्ट्र, मा.पोलिस उपविभागीय अधिकारी भोकर यांना तहसील कार्यालय धर्माबाद मार्फत पाठवण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील, दिवशी ( बु ) तालुका भोकर येथे पाच वर्षांच्या निरागस चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी बलात्कार करून व तिचा खुन करून मृतदेह नदीपात्रात टाकले.

सविस्तर असे की दिवशी बु. गावातील शेतकऱ्याची ५ वर्षांची निरागस चिमुकली आहे, दि.२० जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२:०० वाजतापासून मुलगी घरी नसल्याने तिचा शोध घेणे सुरू केले, परंतु ती मिळाली नसल्याने कुटूंबीयांनी याबाबतची माहिती भोकर पोलीसात दिली.तसेच शोध सुरू ठेवला असता त्यांच्या शेतात काम करणारा सालगडी वय ३५ हा नराधम मुलीला पळवून नेले,असावे असा शंयश व्यक्त होत असल्याने शोध मोहीम सुरूच ठेवली याच दरम्यान सायंकाळी त्या चिमुकलीचा नि वस्त्र व गंभीर अवस्थेतील मृतदेह दिवशी बु.पासून काही अंतरावर तेलंगणा राज्य सीमे सुधा नदी पात्रतात सापडला,हि दुदैवी घटना दुुपारी २:००ते ६:०० वाजता च्या दरम्यान  घडली असून त्या नराधमास भोकर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे, सदरील प्रकरणातील आरोपी असलेल्या नराधमास तात्काळ नवीन दिशा कायद्यानुसार २१ दिवसात फाशीची शिक्षा देऊन पिडीत चिमुकली व तिच्या कुटूंबियास न्याय द्यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी केले राज्याच्या गृह मंत्र्यांकडे मागणी, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अमानवी आहे,देशाच्या कानाकोपऱ्यात दररोज अन्याय अत्याचार होत आहे, ही खेदाचीत बाब आहे, त्यामुळे देशात व राज्यात महीला मध्ये भितीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निवेदनावर बुद्धीवंत लोखंडे- प्रजासेना शहराध्यक्ष धर्माबाद,सुमेध वाघमारे, ओमप्रकाश मिसाळे,शेख अजिम,संदेश वाघमारे,दिनेश बुद्धीवंत,अजय कंधारे यांच्या स्वाक्षरी  आहेत.

ताज्या बातम्या