( विशेष प्रतिनिधी – शिवानंद पांचाळ नायगांवकर )
(दि.२२ ऑगस्ट नायगांव बाजार)
माझ्या राजकीय आयुष्यातील संघर्षाच्या काळात एक पाठीराखा भाऊ म्हणून नायगांव मतदारसंघातील माझा भाऊ सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. या पार्श्वभूमीवर मतदारसंघात काम करत असताना माझ्या प्रत्येक हाकेला मतदारसंघातील माझ्या भावाने साद देत विश्वासाची मोठी ओवाळणी माझ्या पदरी टाकली.
आपण सर्वांनी माझी मनरुपी ओंजळ आत्मीयता व आदराने भरून टाकली . आपल्या सर्वांचा हा जिहवाळा माझ्यासाठी आयुष्यभराची शिदोरी आहे. भाऊ बहिणीच्या नात्याला अधिक दृढ करणारे कितीतरी अनुभव आणि प्रसंग माझ्या पदराशी आहेत. राजकीय क्षेत्रात काम करत असताना मला वडिलांचा आधार आणि सासऱ्यांचे छत्र जरी माझ्या डोक्यावर नसले तरी आपण सर्वांनी भाऊ म्हणून माझ्या भोवती सदिच्छाचे कवचकुंडल उभे करून माझ्या विचारांना प्रत्यक्षात समाजहितासाठी कार्यरत करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यास योगदान दिले.
माझ्या सारखी मीच भाग्यवान, माझ्या असंख्य भावांच्या प्रेरणा व ऊर्जा मला लढण्याचे सामर्थ्य देतात. आपल्या सर्वांच्या मदतीने दरवर्षी माझी राखी वाऱ्याच्या वेगाने मतदारसंघातील आपल्या सहित इतर बांधवांपर्यंत कानाकोपऱ्यात पोहनचते, परंतु या वर्षी काही कारणास्तव माझी राखी आजच्या दिवशी आपल्या पर्यंत पोहचवता आली नाही याची मला मनापासुन खंत आहे . माझ्या या शुभेच्छा रुपी भावनेतुन आपल्या सर्वांपर्यंत माझी राखी पोहचली अशी मी अशा करते . आपल्या सर्वांच्या मनात एक बहिण या नात्याने माझ्या प्रति आणि माझ्या परिवारा प्रति सदैव प्रेम,विश्वास ची भावना कायम राहावी अशी अपेक्षा व्यक्त करते.
मतदारसंघात काम करत असताना आलेले कौटुंबीक-पारिवारिक जिहवाल्याचे अनुभव मला राखी पोर्णिमेनिमित व्यक्त करता आले याचा मला आनंद आहे !
माझ्या प्रत्येक भावास रक्षाबंधनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा !
येणाऱ्या काळात बहीण भावाचे नाते हे असेच फुलत राहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy