नवीन कृषी कायद्यांना जे म्हणतात काळा;त्यांच्या तोंडाला लावायचा का टाळा?

मुंबई दि. 6 – शेतकऱ्यांचा आम्ही सन्मान करतो.केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार करते आहे.त्यानुसार नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. त्यामुळे नवीन कृषी कायद्यांना जे म्हणतात काळा ;त्यांच्या तोंडाला लावायचा का टाळा असा आपल्या खास शैलीत सवाल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी राज्यसभेत केला.मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षणाचा हक्क मिळण्यासाठी पदोन्नती मध्ये आरक्षणाचा कायदा करावा अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी राज्यसभेत केली.

– हेमंत रणपीसे

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत झालेल्या चर्चेत भाग घेताना ना रामदास आठवले यांनी राष्ट्रपतींचे अभिभाषण देशाचा सर्वांगीण विकास साधण्याचे दिशा दर्शन करणारे असल्याचे सांगत राष्ट्रपतींच्या भाषणाचे ना.रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे.

आगामी जनगणना ही जाती आधारित करावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली.तसेच महाराष्ट्रात मराठा; उत्तर प्रदेशात ठाकूर ;हरियाणा मध्ये जाट आणि राजस्थान मध्ये रजपूत या क्षत्रिय जाती आरक्षणाची मागणी करीत आहे.त्यामुळे देशभरात क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळे 10 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी ना रामदास आठवले यांनी आज राज्यसभेत केली.

केंद्र सरकार ने नवीन तीन कृषी कायदे केले ते चांगले आणि शेतकरी हिताचे कायदे आहेत. त्या कायद्यांना विरोध करणे योग्य नसून या कृषी कायद्यांचे स्वागत केले पाहिजे. मात्र काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. या कायद्यांना केंद्र सरकार स्थागती देण्यास तयार आहे. त्यात सुधारणा करण्यास तयार आहे.मात्र तरीही आंदोलन करण्याचे आता काहीच कारण नाही. तरीही आंदोलन होत आहे.जे लोक या कृषी कायद्यांना काळा कायदा म्हणतात त्यांच्या तोंडाला लावला पाहिजे टाळा असे ना.रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला.

ताज्या बातम्या