शेतकऱ्यांच्या भारत बंदला रिपब्लिकन सेना बिलोली च्या वतीने जाहीर पाठींबा !

[ बिलोली – गौतम गावंडे ]

शेतकऱ्यांच्या संदर्भात संसदेत बहुमताचा बहुमताच्या जोरावर मंजूर झालेले कायदे शेतकऱ्यांना त्रासदायक आहेत देशाचा बळीराजा गेले अनेक महिने घरदार सोडून दिल्लीच्या वेशीवर बाजी लावून लढत आहे केंद्र शासनाने या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

संतप्त झालेले शेतकऱ्यांकडून  27 सप्टेंबर सप्टेंबर 2021 रोजी भारत बंद आंदोलन पुकारले आहे. या शेतकरी आंदोलनाला सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन सेना बिलोली तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

यावेळी रिपब्लिकन सेना बिलोली तालुका अध्यक्ष गौतम गावंडे, रिपब्लिकन सेनेचे महासचिव कपिल भेदेकर, युवा अध्यक्ष जयदीप गावंडे, बालाजी डोंगरे ,राजेश एंबडवार, दत्ता मठपती, माधव शेळके, लक्ष्मण गायकवाड मेहराज पठाण, विलास नागोराव अंजनीकर इत्यादींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

ताज्या बातम्या