खरे लाभार्थी योजने पासुन वंचित – डॉ.कासराळीकर !

[ बिलोली – सुनिल जेठे ]
दि .९ डिसेंबर रोजी डॉ.खाकय्याअप्पा स्वामी कासराळीकर यांनी बिलोली तहसिलचे तहसिलदार श्रीकांत निळे यांची भेट घेऊन संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचा ख-या लाभार्थींना लाभ मिळावा या संदर्भात चर्चा केली. बिलोली तालुका व परिसरातील जनता संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेसह इतर योजने पासुन खरे लाभार्थी वंचित असल्याचे मत डॉ.कासराळीकर यांनी व्यक्त केल.
संजय गांधी निराधार योजनेसाठी लोकं बिलोली तहसिल कार्यालयात येऊन विचारपूस करतात. परंतु त्यांना केवळ पोकळ आश्वासन देऊन परत पाठविले जात आहे. तेव्हा या निराधारांनी करायचे तरी काय, त्यांचे प्रश्न सुटले पाहीजे असे वार्ताहराशी बोलताना डॉ.कासराळीकर म्हणाले.
www.massmaharashtra.com 

युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून

ताज्या बातम्या