सातेगांवात खराब गांव रस्ता व जूने पुल तोड़ून नवे पुल निर्माण करावे – सय्यद तुराब हैदर !

● भ्रष्टाचार निर्मूलन समिति पालम तालुका अध्यक्ष सय्यद तुराब हैदर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे रस्ता आणि पुलांची मागणी
( विशेष प्रतिनिधी – रियाज पठान )
सातेगांव गांव रस्ता मागिल दहा वर्षा पासुन खराब झाला असुन  रस्त्यावर खड्डे पडले आहेत.व जुने बांधलेले पुल मोडकळीस आले आहे.

पावसाचे दिवस चालू आहेत. आता पावसाचे पाणी पडले की रस्त्यावर चिखल होत आहे. गावकरी नाइलाजानें चिखलात पडत,भरत घरला जातात व गावात जानारी वाहने सुद्धा गावात जाताना वाहनाची नुकसान होते.
गावत जाताना जुने पुल मोडकळीस आले आहे. पावसात ते वाहूंन गेले आहे.

 गांवक-यांनी तहसील कार्यालयात तक्रार दिली आहे पण काहीं उत्तर मिळाले नाही. ना रस्ता या विषयावर कोणी प्रतिसाद देत आहे. तरी या प्रकरणाची चौकाशी करून गावात रोड व पुलाचे काम लवकारत लवकर चालू करण्यात यावे अशी मागणी सय्यद तुराब हैदर यांनी केली आहे. 

ताज्या बातम्या