शंखी गोगलगाय नियंत्रणासाठी बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांनी करावे प्रतिबंधात्मक उपाय ; कृषी अधिकाऱ्याने केले शेतकऱ्यांना आवाहन !

कुंडलवाडी (अमरनाथ कांबळे )
       बिलोली तालुक्यात मागील दोन वर्षापासून पावसाची सुरुवात लवकर होऊन पाऊस दीर्घ काळ पडत असल्याने गोगलगायीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे होते,साधारणतः सात ते आठ महिने जमिनीत ओलावा असल्याने गोगलगाईच्या पिढ्यामध्ये वाढ झाली व परिणामी गोगलगायीची संख्या भरमसाठ वाढली. तालुक्यात गेल्या वर्षी खरीप पिकावर गोगलगायीचा प्रादुर्भाव होऊन बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते,त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी गोगलगाय नियंत्रणासाठी कृषी विभागाने सांगितलेल्या उपाययोजनेचा अवलंब करावा असे आवाहान प्रभारी तालुका कृषी अधिकारी एस एन तिडके यांनी केले आहे….
             या वर्षीचे हवामान ही सदर किडीस पोषक असून या खरीप हंगामात ही गोगलगायीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही,सोयाबीन व कापूस सारख्या पिकामध्ये रोप अवस्थेतच गोगलगायीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोगलगायींना वेळीच ओळखून त्यांच्या नियंत्रणासाठी तात्काळ खालील प्रमाणे उपाय योजना करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी जेणे करून गोगलगायीचा सुप्तअवस्था नष्ट होतील, शेतकऱ्यांनी मे महिन्यात पूर्वी प्रदुर्भवित सर्व क्षेत्रातील शेतात एक ते दोन फुटाचे चर काढावेत जेणेकरून गोगलगायीला जाण्यास प्रतिबंध करता येईल, गोगलगायीचे वास्तव्य मुख्यतः बांधावरील गवतावर असल्याने शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत, शेताची आडवी उभी नांगरट करून सुप्त अवस्थेतील गोगलगायींना जमिनीच्या पृष्ठभागावर आणावे म्हणजे त्या सूर्याच्या उष्णतेने मरतील व पक्षी त्याचे भक्षण करतील, फळबागेमध्ये झाडांच्या खोडास दहा टक्के बोर्डोपेस्ट लावल्यास गोगलगायी फळबागेतील झाडावर चढत नाहीत, विविध ठिकाणी असलेल्या बोर्ड,भिंती,भेगा,दगडे,बांध, नदी, नाले, ओढे,कालवा, पांदण, किंवा पाणी साचलेल्या सकल भाग या ठिकाणी गोगलगायी सुप्त अवस्थेत असतात त्या जमा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात.असे उपाययोजना करून शेतकऱ्यांनी शंखी गोगलगाय पासून बचाव करून घ्यावे तसेच या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, अथवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी एस एन तिडके यांनी केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या