कोरोना महामारीच्या संकटाचे लाॅकडाउन मुळे, यामध्ये राज्यात झालेले वादळी वाऱ्यासह आवकाळी पावसामुळे राज्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांसह व इतर फळबाग शेतकऱ्यांच्या पिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
या मध्ये मोठ्या प्रमाणात टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुसकान झालेले आहे, त्यानंतर फळबागाची सुध्दा झालेली आहे, शेतकऱ्यांचे टरबूज या पीकांसह ईतर फळबाग व अन्य पीकांचे नुसकान झालेले आहे.
राज्यातील टरबूज उत्पादक , शेतकरी सध्या खूप वाईट परिस्थितीशी झुंज देत आहे , माय बाप सरकार , टरबूज फळ पीक विमा योजनेत समावेश करून संरक्षण द्यावे.
या झालेल्या टरबूज पिकांच्या नुकसांनीचे आधिकारी पाठवून तात्काळ सर्व्हे / पंचनामे करून टरबूज फळ पिकांसह इतर फळबाग व अन्य पिकांची तात्काळ नुकसान भरपाई ची मदत देऊन राज्यातील शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते – शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी एका निवेदनाद्वारे राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy