येथील शहरात विश्वा फाउंडेशन दै.सकाळच्या वतीने श्री फॅमिली गाईड मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 11 रोजी के रामलू मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. हा कार्यक्रम म्हणजे समाजातील सर्वांना आनंदी जीवन जगन्याचा मार्ग कसा मिळवून दयावा,आपले मानसिक स्वास्थ्य कसे राखावे. आपले संस्कार – परंपरा यांची माहिती सर्वांना मिळावी हा कार्यक्रमाचा उद्देश होता.
यावेळी अग्निहोत्रीची का आवश्यकता आहे. या विषयावर सौ. विद्याताई ताटे पंढरपूरकर यांनी वेद, उपनिषद,तत्त्वज्ञान, ऋषी प्रणाली, भगवद्गीतेचे ज्ञान आदीसह अग्निहोत्रीची का आवश्यकता आहे. या विषयावर मार्गदर्शन केले आहे.
यावेळी दै. सकाळचे जिल्हा प्रतिनिधी गजानन बीजेवार, सकाळ समूहचे प्रतिनिधी तिरुपती साळुंखे, बाबू वडजे, सुभाष जाधव, शिवराज साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, भाजपा शहराध्यक्ष हनमल्लू ईरलावार, शिवसेना शहरप्रमुख शंकर कोनेरवार, शहरप्रमुख शिंदे गट लक्ष्मण गंगोने, भाजपा तालुका युवा उपाध्यक्ष शिवकुमार खांडरे, चंद्रशेखर भोरे,मारुती पाटील बोंबले, विनोद भास्कर, प्रशांत पांडे, साई भोकरे आदी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. नरेश बोधनकर,अनिल पेंटावार, दत्तू हामंद, अजय गट्टूवार, करण समेटवार, राहुल सब्बनवार, शिवकुमार गंगोने यांनी परिश्रम घेतले आहे. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दत्तू हामंद यांनी मानले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy