महाराष्ट्राची लोक वाहिनी, गरिबाचे विमान म्हणून सर्वांची लाडकी लालपरी असे विविध उपमा आपण आपल्या लाडक्या बस ला देत असतो. हक्काची बस म्हणजे एस.टी..
एस.टी.अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होत असल्याने मोठ्या उत्सवात वर्धापनदिन साजरा होतोय. एस.टी.महामंडळाच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त बिलोली आगार मध्ये प्रवाशांना पुष्पगुच्छ, व मिठाई वाटप करून शुभेच्छा देण्यात आले.
या वेळी आगार प्रमुख सुभाष पवार, वरिष्ठ लिपिक राजेश कदम, हणमंत पाटील, एम.टी.फारुखी, विजय कोलंबरे, अविनाश जाधव, दत्ता गजलोड, शेख अफजल, बी.जी.पोटे, पत्रकार रत्नाकर जाधव पत्रकार जयवर्धन भोसीकर यांची उपस्तिथी होती. सोबतच मोठ्या संख्येने आगारातील कर्मचारी, प्रवाशी उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy