हदगाव तालुक्यातील मौजे तामसा येथील जे.जे.हराळे नायब तहसिलदार, संजय बिराडे मंडळ अधिकारी, रुपेश जाधव तलाठी यांच्यावर खोटे गुन्हा नोंद केल्याने तेथील स.पो.नि.अशोक उजगारे यांची कायदेशीर चौकशी करुन तात्काळ निलंबन करण्यात यावे अशा मागणीचे बिलोली तलाठी संघटनेच्या वतीने लेखनी बंद आंदोलनाचे निवेदन २९ नोव्हेंबर रोजी तहसिलदार श्रीकांत निळे यांना देण्यात आले.
या प्रकरणी खोटे गुन्हे रद्द करुन स.पो.नि.उजगारे यांची कायदेशीर चौकशी करुन निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी बिलोली तहसिलदार यांना निवेदन देऊन लेखनी बंद आंदोलन करण्यात आले.
यावेळी तलाठी संघटनेचे ता.अध्यक्ष एल.जी.तोटावाड, उपाध्यक्ष डी.टी. माळेगावकर, सचिव सचिन आरु यांच्यासह तलाठी गायकवाड, पवण ठक्करोड, अशोक गीरी, बाबूराव मुळेकर, माधव राजकुंडल, राजू मेहञे, संदीप सोनवणे व अदी तलाठी लेखनी बंद आंदोलनात उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy