ठाण्यात एका तरुणाने आत्महत्या केली आहे, त्यामागचे कारण अद्यापही समजू शकले नसले,तरी या तरुणाने प्रेमसंबंध अथवा आर्थिक व्यवहारातून आत्महत्या केली असावी का? या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
शहरात एका 21 वर्षीय तरुणाने राहत्या घरातील छताच्या कडीला साडी बांधून गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.ही घटना भिवंडी तालुक्यातील वडपे गावात घडली असून याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नसले,तरी या तरुणाने प्रेमसंबंध अथवा आर्थिक व्यवहारातून आत्महत्या केली असावी का? या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.जितेश बळीराम तारे असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
जितेश हा भिवंडी तालुक्यातील वडपे गावात कुटुंबासह राहत होता. शुक्रवारी सकाळच्या सुमारास तो बँकेत गेला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास आरटीओ कॅम्पमध्ये ड्रायव्हिंग लायसनसाठी चाचणी देऊन तो घरी आला. घरी आल्यानंतर बेडरूममध्ये जाऊन त्याने आतून कडी लावून घेतली. त्यानंतर छताच्या लाकडी कडीला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. उशिरापर्यंत जितेश बाहेर आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी दरवाजा ठोठवण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. जितेश दरवाजा उघडत नसल्यामुळे कुटुबीयांनी दरवाजा तोडून पाहिले असता, याचा मृतदेह साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती तात्काळ भिवंडी तालुका पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्रेयन राठोड यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. पुढील कारवाईसाठी मृतदेह स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतदेहाच्या विच्छेदनानंतर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy