रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यात तोक्ते चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत झाले असून काही भागामध्ये चक्री वादळाने घराचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भिंतीचे छपरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाड, पोलादपूर येथील घरांचे नुकसान झाले.
तसेच म्हसळा येथील खरसई गावातील घरावरील छपरं वादळाने उडाली आहेत.काही भागात मोठमोठी झाडे उन्मळून पडलेली दिसून आली.
तसेच समुद्र किनाऱ्या लगतच्या भागातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने रेड अलैर्ट केलेला असून कोणी हि घराबाहेर निघू नये असे संकेत दिले आहेत.
रायगड जिल्ह्यातील समुद्र व खाडीवरती भागातील जवळ जवळ 8 हजार 380 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले असून पुढील 12 तास सतर्कतेचा इशारा देण्यांत आलेला आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy