भारत जोडो यात्रेनिमित्ताने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेचे स्वागताचे भव्य जय्यत तयारी.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी-गजानन चौधरी ]
भारत जोडो यात्रेनिमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष युवा नेते राहुलजी गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर यात्रेचे आगमन महाराष्ट्रात प्रथमच देगलूर पासून रामतीर्थ, नायगाव, नांदेड, पर्यंत भव्य दिव्य हजारोंच्या संख्येने पदयात्रा निघणार असल्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकप्रिय नेते अशोकरावजी चव्हाण यांच्या आदेशानुसार नायगावचे माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चव्हाण परिवाराच्या वतीने नायगाव मतदार संघातील उमरी धर्माबाद नायगाव तालुक्यात सर्वत्र गावो गावी जाऊन कार्यकर्ते व नागरिकांची बैठक घेऊन भारत जोडो यात्रेत सामील होण्यासाठी निमंत्रण दिलेले आहे.

यानिमित्ताने नायगाव मतदारसंघातील लाखो कार्यकर्ते नागरिक या पदयात्रेत सामील होणार असल्यामुळे नायगाव शहरांमध्ये जागोजागी बॅनर कमानी उभ्या करून युवा नेते राहुलजी गांधी यांच्या सोबत येणाऱ्या सर्व टीमचे भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार वसंतरावजी पाटील चव्हाण, यांच्या सह सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण, पंचायत समितीचे सदस्य हनमंतराव पाटील चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती सय्यद रहीम शेठ, नायगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, अल्पसंख्यांकचे अध्यक्ष सय्यद इसाक शेठ, नायगाव तालुका काँग्रेसचे सरचिटणीस गजानन चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक कार्यकर्ते यांनी केले असून नायगाव येथील काँग्रेसचे युवा नेते राहुलजी गांधी यांचे विश्रांतीची व्यवस्था कुसुम लॉन्स सभागृहामध्ये, सोबत आलेल्या आमदारांचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांची विश्रांती व भोजन व्यवस्था जयराज पॅलेस येथे तर कार्यकर्त्यांसाठी विश्रांती व भोजनाची व्यवस्था अंबिका गार्डन येथे करण्यात आली असल्यामुळे मतदारसंघासह तालुक्यातील कार्य कार्यकर्ते नागरिक पदाधिकारी यांनी या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन चव्हाण परिवारांच्या वतीने करण्यात आले आहे.

Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या